आभाळात दाटलेले ढग, बस मधुन दिसनारे डोंगर अन त्या डोंगरा जवळून जाणारे ढग जणू काही धरणी बरोबर मिलनास आतुर आहेत अस वाटत अन
मग मधेच पावसाची एक सर. हे सगळ बस मधून पाहिल ते मागच्या शुक्रवारी कोल्हपुरहून पूण्याला जाताना. त्या प्रवासात सुचलेली ही कविता.......
आभाळी नभ दाटलेले
खाली वाढे धरणीची प्यास
दोघ मिलनाला आतुर
सोसवेना विरह दोघास॥१॥
वारा भारीच खटयाळ
नभा आणी धरणी जवळ
क्षणी पालटे बदमाश
पुन्हा नेइ दूर दूर॥२॥
सुर्य राजा कसा चोर
गमंत पाहि वरून
धरणीची घालमेल
पाहि नभाच्या आडून॥३॥
दोघांचे मिलन ठरलेले
एक नशिब दोघांचे
धो धो बरसे नभ
काही चालेना कूणाचे॥४॥
रीता परी समाधानी
झाला नभ बरसून
तॄप्त झाली धरणी वेडी
जलरूपी प्रेम पिऊन॥५॥
नभा म्हणे प्रेमबाला
पून्हा कधि रे मिलन
दोन क्षणांचा विरह राणी
वाट पहा हिरवा शालू लेऊन॥६॥
Monday, February 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment